Saturday 23 July 2011

तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला ,,,,,,,,१

||शिवरायाय नमः ||
कळीकाळालाही आव्हान द्यायला तयार असणारे  मावळे ,छ्त्रपतींसाठी मृत्यूलाही कवटाळनारे शिवाकाशीद,आणि रात्रीच्या त्या घोर अंधारात महाराजांना पालखीत बसवून सुखरूप विशाळगडी पोहचवणारे सारे पालखीचे भोई ,,,,,
आणि ,,,,,
साक्षात मृत्यूलाही जरा थांब माझा धनी गडावर पोहचला नाही तोपर्यंत ,,,,
मी मारणार हि नाही असे सांगणारे बाजी प्रभू देशपांडे यांच्या
पराक्रमाला वंदन करण्यासाठी आम्ही सारे या भूतलावरचे आजचे मावळे
आई भवानीच्या आशीर्वादाने हो तिच्याच आशीर्वादाने
नाहीतर नेमक आम्हालाच का या पायवाटेवर चालायचं भाग्य मिळाव ?
शिवशौर्याला प्रणाम करायला नियतीने आमचीच निवड का करावी?
खरतर शाळेत शिकवलं होत. ,,,,,,
पन्हाळ्याला सिद्धी जोहरने वेढा घातला होता ,
महाराज त्या वेढ्यातून निसटले त्यासाठी शिवा न्हावी तोतया शिवाजी बनून गेला
आणि सिद्धीने त्याला पकडलं आणि मग खाराप्रकार लक्षात आल्यावर
त्याला मारून टाकल ,,,,,,
पुढे मग तो महाराजांच्या पाठलागावर निघाला आणि
घोडखिंडीत मग बाजी प्रभू माराजांना म्हणाले तुम्ही पुढे व्हा  मी पाहतो
आणि घोर रणसंग्राम झाला त्यात बाजी प्रभू कामी आले
तोफांचा आवाज ऐकल्यावर त्यांनी आपला देह ठेवला,,,,,,,,,,,,
खरच हा सारा ईतिहास असा चार ओळीत सांगता येईल,,,,,,,,,,,,,,,,?
आणि हेच शिवशौर्य समजून घेण्यासाठी आम्ही निघालो
१३.७.११ रोजी रात्री सकाळी आम्ही ज्योतिबाच दर्शन घेतलं
आणि पन्हाळ्यावर आलो पन्हाळा दर्शन घेतलं आणि निघालो
त्या वाटेवर ज्या वाटेवरून साक्षात महाराज आणि त्यांचे मावळे
३५१ वर्षापूर्वी गेले होते आणि मग हळू हळू लक्षात येवू लागल
कमरेचे काटे ढिले पडू लागले ,,,,
मांड्या पोटर्या भरून आल्या ,,,
ढुंगनाच भज झाल पडून पडून पाय घसरून
हाड खिळ खिळी झाली ,,,,,,
बर आमच्या कडे ना ओझ न काही त्रास
त्रास सोसण्यासाठी बस होती आमच समान वाहून आणत होती.
मुक्कामी आयत तेही सुंदर जेवायला मिळत होत ,,,,,
झोपायला मस्त पैकी स्लीपिंग ब्याग होती ,,,,
आणि तरीही आम्ही थकत होतो,,,,,,,,,,,,,,,,?
आणि सहजच मनात विचार आला या सार्या सुविधा त्या काळी महाराजांकडे असतील,,,,,,,,,?
आणि त्या शिवशौर्याने  आम्हाला जाग केल ,,,,,,,,
जिथे आमची आमची ईच्छा ताकद हिम्मत हात टेकते 

नेमकी तिथेच ,,,,,,,,,
महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची निष्ठा या सार्या वर मात करून
पुढे जे यशस्वी होते आणि त्यातून निर्माण होत स्वराज्य,,,,,,,,,,,,,,

आणि सार समजून घेण्यासाठी मात्र  या वाटे वर गेलच पाहिजे
त्या शिवशौर्याचा अनुभव घेतलाच पाहिजे,,,,,,
धर्मशास्त्र  सांगत ३ गोष्टी नित्य नूतन ,,,,,
१- रामायण महाभारताची कथा
२- सूर्योदय सूर्यास्त
३-स्वतःची पत्नी
पण गेली १० वर्षे या वाटेवर चालल्यावर लक्षात आल ,,,,,,,,
ईतिहासाच गुणगान,,,,
शिवप्रतापाच गायन,,,
आणि  
या सार्यांच्या शिवशौर्याच्या कथा ,,,,,ह्याच नित्य नूतन आहेत असो,

तारीखवार बोलन हा माझा स्वभाव नाही आणि विषयही नाही त्यामुळे हा
सारा पराक्रम ज्या भूमीत घडला तो मी तारीखवार नही सांगणार करणं मी संशोधक नाही अभ्यासक तर मुळीच नाही माझा स्वतःच अनुभव सांगतो सनावळीत अडकलेला
ईतिहास वाचताना माणूस नेहमी नापास होतो,,,,,,,,,,
महाराजांचं कार्य कर्तुत्व राहत बाजूला
आणि त्यांच्या जन्म मरणाचा वाद होत राहतो

छत्रपतींवर बोलयला सुरवात केली आपण हमखास बोलतो
अरे त्यांचा सेनापती मुसलमान होता ,विश्वासू मदारी मेहतर होता ,,,
मग आपसूकच त्यांना सर्व धर्म समभावाच्या देव्हार्यात बसवतो,,,,,,
महाराज कसे धर्म निरपेक्ष होते ते चित्र समोर ठेवतो
खरतर सर्वधर्म समभाव म्हणजे ,,,
"ज्या सर्व धर्मांमध्ये समानतेचा आभाव आहे " तो ,,,,,,

महाराजांची धर्मनिरपेक्षता अशी होती कि मी तुमच्या मशिदींना हात
लावणार नाही पण,,,,? आमची
देवळ पाडून त्याच्या मशिदी केल्या असतील तर ,,,?
त्या मशिदी पडून मी
देवळ बांधणारच त्यासाठी कुणाची परवानगी घेणार नाही राम खरच येथे होता का?
नाहीतर अस कारण येथे हॉस्पिटल बांधा,,,वारे धर्मनिरपेक्षता?
या असल्या बेगडी धर्मनिरपेक्षतेची महाराजांना लाजच वाटत असेल ,,,
अगदी कालपरवाच कसाब काय किवा १३ ची बॉमस्पोट  मालिका काय,,,
सरकार अजूनही कारवाईच्या विचारात आहे तर कुणी फरारी आहे ,,,,
कुणी काहीही बोलत नाही मात्र जे तावातावाने अन्न आणि  रामदेव बाबाला पाठींबा देत होते .
बर पाठींबा म्हणजे काय तर एक मिस्स कॉल ,,,,,,,,,,,,,,,,,
आज ज्या वाटेवर चालतोय त्या वाटेवर असाच मिस्स कॉल महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी दिला असता तर,,,?
आज जे सुख उपभोगतोय ते उपभोगायला तरी मिळाल असता का?
कोण कुठला अमित मेंगळे त्याला या वाटेवर आपल्याला घेवून यायचं सुचल तरी असत का?
फेसबुकवर आज बाजींची जयंती, पुण्यतिथी ,विशाल संग्राम अस काही अपडेट्स टाकल्या असत्या ,,,,,,,

सांगायचं ईतकच ताज ओबेरायजवळ मेणबत्या पेटवून आमची राष्ट्रभक्ती नाही साजरी होत .
छत्रपतींच्या बाजींच्या शिवशौर्याची हि शिकवण नाही,,,,,,,,,,
लढाईत शत्रूला मारून मग नाईलाज झाला तरच मरा,,,
न कि एक गाल मग दुसरा गाल असा खेळ खेळा,,,

हि शिकवण आहे अहिंसेची शिवशौर्याची  ,,,,,,,
अपशकुनाला शकुनात बदलत ते शिव शौर्य,,,,,,
त्यांना माहित होत देवाला आता दह्या दुधाचे अभिषेक खूप झाले
आता त्याला रक्ताचा अभिषेक हवाय तो हि शत्रूच्या ,,,
आणि ३२ दातांच्या बोकडाचा बळी दिलाही

पहा जरा आपली सारी दैवत शास्त्र सज्ज आहेत
हात जोडून नाहीत,,,,
परंतु देदी हमे आझादी बिना खडग बिना ढाल,,,,,
हे त्रिकाल अभादित असत्य आम्ही मनावर ईतक कोरून घेतलं कि
महाराजांचा ईतिहास हि येथे फिका पडावा,,,

आम्ही फक्त निषेध करतो आणि स्वस्थ बसतो .
आमची ईति कर्तव्यता संपते सामाजिक बांधिलकी संपते.
महाराजांच्या ईतिहासात डोकावलं तर लक्षात येईल रामाला जशी वानरसेना मिळाली
तशीच असंख्य निष्ठ्वान मावळ्यांची फौज महाराजांना मिळाली ,,,,,,
आणि या सार्या मावळ्यांचा सेनापती शोभावा असा शिवा काशीद,,,,,,
पन्हाळ्यावरून निसटताना  सिद्धी जोहरच्या हाती लागला ,
त्यांनी लगेचच दिवाळी साजरी केली सिवा हाती लागला
प्रत्यक्ष शिवाजीला कैद केल.........
ते हि जिंदा परंतु थोड्याच वेळात महाराजांचं हा डाव त्यांच्या लक्षात आला .
ते सावध झाले त्या नकली शिवाजीच्या छाताडावर तलवार टेकवून त्याला
विचारलं बोल सिवा कहा गया ,,,,,,?
खर खर सांग नाहीतर,,,,,,?
नाही तर ? नाही तर काय?
आर जीव गेला तरी बी सांगणार नाय तुला महाराज कुट गेल्ये ,,,,,
मला मरणाची भीती दवातोस ?
आर ह्या अंगावर महाराजांची कापड चढवली आन म्या पावन झालो
माझ्या राजा साठी म्या हजारदा मारायला तयार हाय
तू र काय मला मारणार?
जावा ह्ये कापड चढवल तवाच माझ्या बायकोच्या कपाळाच कुकू पुसून आलो
तू काय मला मारणार?
ह्ये महाराजांची कापड चढवली आन म्या हजार जलम जगलो
आर या फूड निष्ठावंतांची जवा कवा महाराज
यादी बनवतील तवा माज नाव सर्वात वर असाल तू र काय मला मरणाची भीती दवातोस? मला मारलास तरी बी जिवंतच राहीन

जगायला काय र कुत्री मांजरी बी जगत्यात आणि त्यातच सिद्धी जोहरने
खचकन तलवार शिवाच्या छाताडात खुपसली
शिवा पडला पडता पडता ईतर मावळ्यांना म्हणाला
मित्रांनो आपल्या राजाला सांगा शिवा शत्रूला पाठ दाखवून न्हाई पळाला छातीवर घाव झेलला महाराजांना सोबल असाच मेला  ,,,,,,,

या सिद्याला झुलवायला जो येळ मिळाला म्या धन्य झालो
पावन झालो माझ्या आयुष्याच सोन झाल.
आता वर देवाला ईचर्नार हाय म्या राजांवर ओवाळून टाकायला मला एकच जलम का दिला ?
हि होती निष्ठा शिवशौर्याची ,,,,,,,,
आणि सिद्धी पाठलागावर निघाला
पांढरपाण्यापाशी  गाठ पडली आता मोठी पंचाईत झाली पुढे काय करायचं ?
बाजी म्हणाले महाराज तुम्ही पुढ व्हा
३०० मावळे माझ्या पाशी ठेवा मी घोड खिडीत त्यांना अडवतो
तुम्ही विशाळगडी पोहचताच ईशारति करा
मी मागो मग येतोच पण,,,,,,,
हे सार ईतक सोप्प नव्हत केवळ ३०० मावळे घेवून
सिद्धीच्या फौजेशी लढण सोप्प नव्हत....
पण बाजी लढले कळी काळाच्या हि उरात धडकी बसेल
अशा आवेशात लढले साक्षात मृत्यूने त्या घोड खिंडीत तांडव घातल,,,
सिद्धीला बाजीला थोपवण भारी जात होत आणि
काळान डाव साधला
बंदुकीची गोळी वर्मी लागली
आधीच जखमांनी बाजींच्या देहाची चाळण उडाली होती .
परंतु विशाल गडावरून काही ईशारति होत नव्हत्या
आणि बाजींच देह काही केल्या खाली पडत नव्हता
पराक्रमान हि लाजून तोंडात बोट घालाव असा पराक्रम बाजी गाजवत होता
आणि महाराज गडावर पोहचे ईशारति झाली तोफांचे आवाज ऐकले
आणि बाजींनी देह ठेवला
घोड खिंड पावन खिंड झाली बाजींच्या रक्तान पावन झाली
बाजींच्या निष्ठेने पावन झाली.