Friday 4 November 2011

गड किल्यांवर का जावे?

||श्री शिवरायाय नमः ||
छत्रपती शिवाजी महाराज कि... असे म्हटले कि तमाम मराठी जनांच्या तोंडून 'जय' असे जयघोष बाहेर पडतात.
परंतु खरंच महाराजांची ही मावळे आज राजेँचे विचार वेशीला टांगुन महाराजांचे विचार जणू पायदळीच तुडवतात.
"राजे तुम्ही पुन्हा जन्माला या" असे वाक्य मोटार गाड्यांवर लावून अभिमानाने मिरवितो.
मात्र याच मोटरी बिअरबार,देशी दारुची दुकांना समोर पाहताना काय वाटत असेल राजांना........
अरे त्या विचारांचा नुसता देखावा नको..
मावळ्यांनी युद्धात जिँकून आणलेल्या एका सुंदर स्ञीला आपल्या मातेचा दर्जा दिला आमच्या महाराजांनी
मात्र आज हेच मावळे एखादि तरुणी समोरुन चालली तर किती घाणेरडे विचार मनात आणतात?..
महाराजांनी स्वराज्य रक्षणार्थ बांधलेले गड,किल्ले महाराष्ट्राची रत्ने आहेत.
आणि याच गडांवर महाविद्यालयीन तरुण-तरुणीँचे अतीशय गलिच्छ चाळे सुरु असतात,
गडाची स्वच्छता सोडाच पण आपल्या बरोबर आणलेल्या पदार्थाँचा कचरा,
शितपेयाच्या बाटल्या त्या गडाला जणू आंदण म्हणून भेटवस्तू देतात.
दगडांवर नाना प्रकारचे घाणेरडे विचार लिहुन आपली लायकि दाखवतात
कशाला आम्ही काल राजगडावर हि हेच चित्र पाहिलं .
शिवरायांचे धगधगते जिवनचरीत्र म्हणजे भारताच्या पिढ्यान पिढ्यांना अलौकीक
राज्यकर्त्याचे नित्य प्रेरणादायी आदर्श वस्तुपाठच आहे.
अश्या ह्या लोकोत्तर महापुरुषाचे कार्य आणि जिवनगाथा नविन
पिढीला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांतून बाहेर काढून अधीकाधीक शिकवायला
गड किल्यांवर जायला हवे.
एकंदरच या भरत भूमीला देवांच वरदान आहे 
जेव्हा जेव्हा तुम्ही सारे
संकटात सापडलं तेव्हा तेव्हा मी स्वतः (ईश्वर ) अवतार घेईन,,,,,
हो पण हे अवतार घेण ईतक सोप्प नाही नव्हत देखील ,,,,,
आणि याचा अनुभव या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने घेतला होता .
मुसलमानांच्या जुलमाला सारेच कंटाळले होते त्याही वेळी
सार्यांना वाटत होत शिवाजी जन्माला यावा पण,,,,,,,,,,,,,
दुसर्याच्या घरात ,,,,, हि ब्याद आमच्या घरात नको .
नाही तर मोगलांचा छळ सहन करावा लागेल.

पण या सार्यात मत जिजाबाई वेगळ्या होत्या त्यांनी ह्या सार्या
गोष्टींचा अभ्यास केला होता
गड किल्ल्यांची ताकद माहित होती .मोहित्यांची जाधवांची भोसल्यांची
नाती अनुभवली होती विळ्या भोपळ्याचं नात अनुभवलं होत ,
सख्खे भाऊ  एकमेकांचे पक्के वैरी कसे होतात आणि तेही
छोट्या मोठ्या देशमुखीसाठी,,,?
वतनासाठी एकमेकांच्या उरावर बसणारे भावूबंद पहिले होते ,
हिंदूंच्या आय बहिणी मुसलमानांच्या जनान खाण्याच्या शोभा वाढवत होत्या .
राजरोस गायींच्या कत्तली केल्या जात होत्या ,
देवळ फोडली जात होती हिंदू नागवला जात होता पण ,,,,,,,,,
एकत्र होत नव्हता स्वतःचाच झेंडा मिरवण्यात धन्यता मनात होता.

बादशहाची तळी आणि मर्जी राखण्यात आयुष्य वेचत होता ,,,,
आणि हे सार त्या माऊलीला  सहन होत नव्हत आणि म्हणून मग
तिने या महाराष्ट्र भवानीला साकड घातलं,,,,,
आणि आई भवानी पुन्हा एकदा भक्ताचा हाकेला ओ देत आली,
जिजा बाईनी गजरच ईतका मोठा केला कि वरचा विठ्ठल खाली आला
आणि खालचा विठ्ठल भक्त  झाला ,,,,,,,,
पुन्हा एकदा पुण्याच्या पुण्यभूमीवर जिथे मुसलमान गाढवांचा नांगर 
फिरवत होते तिथे त्याच निर्भयतेने सोन्याचा नांगर फिरवला गेला,,,,,,
डोळ्यातल्या साठवलेल्या रागाच प्रतीकच जणू  छत्रपतीन  मध्ये अवतरलं होत,,,,,,
ईतक्या सहजासहजी नव्हते आले शिवराय,,,,,,
बर हि परंपरा फार पूर्वापार आहे
देवाने अवतार घेण नवीन नाही तुमची आर्तता किती मोठी ,,,?
तुम्हाला त्या गोष्टीची धग किती ,,?
सामाजिक बांधीलकीच भान किती,,?
सार्या सार्याची देव परीक्षा घेतो आळश्यांना  त्याने कधी मदत नाही केली आणि कर्तुत्ववाणांना कधी मागे नाही सारल,,,

बर हि परिस्थिती कायम होती महाराजांच्या आधीही
रामासाठी पुत्र कामेस्ठी यज्ञ करावा लागला
कृष्णाला नंदाच्या घरी वाढव लागल,,,
कुंतीचे पाच पांडव हि असेच नाही आले दुर्वास
ज्याचा लोकांना ईतका धाक होता कि दूर -वास व्हा दूर राहण्यास योग्य
अशा साधूचे काम करावे लागले,,
भीष्म ईतक्या सहजी नाही आले
हनुमंत ,ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ,
समर्थ रामदास ,
सारे सारे महाभाग ज्यांचे या भरत भूमीवर अनंत उपकार आहेत
ते सारेच एका ध्येयाने प्रेरित होवून आले होते
आणि तेच ध्येय होत जिजाबाई आणि राजे शहाजी यांचे ,,,
म्हणून श्री .शिवाजी महाराज जन्माला आले आणि भूमी
त्यांनी नीरयवन  केली म्लेन्छमुक्त केली ,,,,,,,

आज पुन्हा आपणाला या भरत भूमीला श्री.शिवाजी महाराजांची गरज आहे.
आपले सारेच नेते नाकर्ते आहेत हे आपल्याला हि ठावूक आहे
मग ह्या राष्ट्राप्रती आपल काही देण लागत का नाही?
रोग होवू नये यासाठी ईलाज करावा लागेल म्हणजे,,,,,
आपल्यात जिजामाता जागवावी लागेल
राजे शहाजी जागवावे लागतील,,,
तर आणि तरच देशाचा आणि पर्यायाने आपला

आपल्या मुलाबाळांचा उज्ज्वल भवितव्य घडवता येईल,,,,,,
लक्षात ठेवा छत्रपतीन सारखा नेता लाभला तर शेळ्या मेंढ्यांच
लाचार जीण जगणारी हि प्रजा तिने महाराजां नंतर हि
औरंगजेबास जेरीस आणल,,,,,,अटकेपार भगवा फडकवला
तेव्हा या सारे सारे
हे गड दुर्ग आज पड झड झालेले आहेत . अंगावर असंख्य तलवारिंचे यांनी घाव झेलले आहेत .
तोफांचा मारा यांनी सहन केला आहे . अनेक विरांच्या समिधा यासाठी अर्पण झाल्या आहेत
चला तर मग, या मूक साक्षीदारांचे बोलविते होऊ, आपल्या पुढच्या पिढीस काही तरी ठेवा देवू.
जेणेकरून ते इतिहासातुन काही तरी बोध घेतील, आपले पूर्वज किती थोर होते हेही जाणतील आणि हे सारे जाणायचे असेल तर...?
घरातील सोफ्यावारून उठा आणि डोळे उघडून कान टवकारून ऐका तो इतिहास...
तुम्हास बोलावतो आहें कारण जो इतिहास विसरतो तो भविष्य घडवू शकत नाही

महाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला
करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्या हाकेला ओ देईल,,,
एक तरी गड किल्ला फिरून बघा
एकटे शिवाजी महाराज जर ईतका काही करू शकतात तर आपणात प्रत्येकात
एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..

महाराजांचा इतिहास आज अमेरिका,फ्राँस,जपान, इग्लंड अगदि पाकिस्तानातील बहुसंख्य विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत आहेत
माञ आम्ही महारांचा रोज इतिहासातील एक एक घटना पुसत चाललो आहोत.
अहो अशाने राजेच काय परंतु एक मावळाही जन्मास येणार नाही ..
नुसते पुतळे चौकाचौकात उभे करुण ट्रँफिक जाम करण्यापेक्षा
आपल्या अंतरंगात व आचरणात राजांचे  विचार आत्मसात करा.
तरच त्या अनाम गडवीरांना आणि गड किल्यांना भेट दिल्याचा फायदा होईल.

No comments:

Post a Comment