Monday 16 January 2012

जव्हार-भूपतगड


||श्री शिवरायाय नमः ||
जिथे साक्षात छत्रपतींनीही जायच्या आधी विचार केला असता
तिथे ईतर मुसलमान राजांनी स्वप्नात सुद्धा तिथे जाण्याचा विचार केला नेसल असा हा गड भूपत गड ,,,
मुंबई जवळ असूनही दुर्गम भाग सहज जावू याचा विचारही कुणी
करू नये असा हा भूपत गड,,
ईथे खरतर मला गडाची माहिती देण्यापेक्षा ईतर माहिती द्यावीशी वाटते
"माझ्या कडे  फाटके बूट होते वापरायला आणिते फाटके बूट
घालायला धड पाय हि नाहीत अशी अवस्था असलेला हा भूपत गडचा
जव्हार मधील दुर्गम भाग,,,
आपल्याकडे फाटके असले तरी कपडे आहेत घायला पण मुंबई जवळच्या त्या
साऱ्या आदिवसी पाड्यातील लोकांकडे ते कपडेही नाहीत
आपल्या कडे शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत त्यांच्या कडे त्या मुलभूत गरजा भागवायला महाग आहेत
आपल्या कडे दात आणि चणे हि आहेत .
त्यांच्या कडे दातही नाही आणि चणेही नाहीत आणि तरीही आम्ही जेव्हा फिरलो
मुकबधीर शाळेच्या प्रमिला कोकड ज्यांचा या कार्याचा गौरव
देशाच्या राष्ट्रपतीं "प्रतिभा ताई पाटील "हातून झाला आहे,
तिथल्या मुकबधीर शाळेत तेव्हा असे वाटले आपणच खरे मुकबधीर आहोत
आपल्या जवळच्या जिल्ह्यात ह्या मुलभूत गरजा नाहीत आणि
आपण मूक राहतो आणि त्यांच्या जाणीवां विषयी बधीर हि आहोत ,,,
त्यांचे कलाकुसूर करणारे हात पहिले कि आपल्याला आपल्याच हातांची लाज वाटते
आपल्या हात किमान त्यांच्या साठी देवाकडे प्राथना करण्यासाठी साठी जरी जोडले
तरी जन्माच सार्थक होईल असे वाटते ,,
आणि देवबांधचे साठे काका वयाची ६० ओलांडली तरी नव्या उत्साहाने आम्हाला
ते करत असलेल्या कार्याची माहिती करून देत होते आणि हे सार सांगताना कुठेही अस जाणवत नव्हत
कि आमच्या कडे मदत मागत आहेत ,,,
वर आम्ही तिथे दुपारी पोहोचलो तर आमच्या साठी तिथे मांडव घातला होता
सतरंज्या अंथरल्या होत्या थंडगार पाण्याची व्यवस्था होती
ज्या गावात रात्री मुक्काम केला होता
तिथे तर आम्ही येणार म्हणू रस्ता स्वच्छ केला होता
पाण्याने शिंपडून सरळ केला होता
आणि आपण सारे अनास्थी ,,,,
स्वातंत्र्याच्या ६० वर्ष नंतरही त्यांच्या तेथील आदिवासींच्या जीवनात
स्वातंत्र्याचा सूर्य पोहचलेला नाही हे तिथे गेल्यावर कळत,,,
चार बांबुचे पाल हीच त्यांची मालमत्ता ,

शिकवायला धड शिक्षणही नाही त्यांच्याच गावातील सर्वात जास्त
म्हणजे १२ पास झालेला माणूस हाच त्यांचा शिक्षक ,,
आरोग्य सुविधा कशाशी खातात हे त्यांना माहित नाही,,
असा हा भूपतगड आणि त्याचाह परिसर ईकडा तरी अनुभवावा
जव्हार मोखाडा मार्गावर देवबांध,,,
जव्हार किंवा खोडाल्याहून बसने ईथे याव पुढे नदी ओलांडून डावीकडे
एक कच्चा रस्ता फुटतो मग आडोशी गाव,,,
तिथून पुढे पाथर्डी आणि गावात शिरल कि भूपत गडच मनोहारी दर्शन होत ,,
असे ३\४ वेळा नदी ओलांडावी लागते,
तिसर्यांदा नदी ओलांडली कि दिसते कुर्लोदची वाडी कुर्लोद हे भूपत गडच्या
पायथ्याच गाव ईथूनच झाप या गावी हि जाता येत,
तास जव्हार हून थेट कुर्लोद्लाहि येत येत,
गडाच्या टोकाकडे चालत निघाव
वर पोहचल्यावर उजव्याबाजूला एक उंचवटा दिसतो,
थोड पुढ गेल्यावर काही जोती व त्यानंतर देवाची खोपी दिसते,
त्याला लागूनच गडाच्या मूळच्या दरवाजाचे अवशेष दिसतात,
त्याच्या थोड पुढे लहानसं तळ दिसत हे सार बघून मग मागे वळायच कुर्लोदची
वाट सोडून झाप कडे चालू लागायचं खाली उतरल्यावर झाप हून
एसटी ने जव्हार मग मुंबई गाठायची
मुंबईला आलो खरा पण तिथले आदिवासी काही डोक्यातून जात नव्हते
खरतर मुंबई जवळ आदिवासी पाडा ,गाव,जिल्हा  ? हेच मुळात मान्य होत नाही,
तिथे हे सारे आदिवासी राहतात ज्याच्याकडे वीज नाही पाणी नाही
पण मनाची श्रीमंती ईतकी आहे कि विचारू नका शब्द नाहीत .

ईतिहासाच हे छुप पान उघडलं गेल दुर्लक्षित भाग समोर आणला
अशा ह्या भूपत गडाची मोहीम शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राबवली गेली ,
आणि त्याला श्री.श्रीदत्त राउत यांनी मोलाची साथ दिली
धन्यवाद शतशः धन्यवाद .

खालील  लिंक वर क्लिक केले तर जव्हार भूपतगडाचे  फोटो दिसतील.
https://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu12&target=ALBUM&id=5690886827952087585&authkey=Gv1sRgCNmqg-WuqtbuBw&feat=एमैल

1 comment: